प्रश्नसंच १४९ - राज्यशास्त्र

MT Quiz [प्र.१] राष्ट्रीय मतदार दिन केव्हा साजरा करण्यात येतो?
१] २४ जानेवारी 
२] २५ जानेवारी 
३] २७ जानेवारी
४] २८ जानेवारी


२] २५ जानेवारी
----------------
[प्र.२] खालीलपैकी कोणते स्वातंत्र्य भारतीय नागरिकांना नाही?
१] शासनाचा विरोध करण्याचे स्वातंत्र्य.
२] सशस्त्र विरोध करण्याचे व त्यात भाग घेण्याचे स्वातंत्र्य.
३] सरकार बदलण्यासाठी आंदोलन सुरु करण्याचे स्वातंत्र्य.
४] घटनेच्या केंद्रीय मूल्यांना विरोध करण्याचे स्वातंत्र्य.


२] सशस्त्र विरोध करण्याचे व त्यात भाग घेण्याचे स्वातंत्र्य.
----------------
[प्र.३] भारतातील निवडणुका लोकशाही पद्धतीने होतात, हे दर्शविणारी वाक्ये खाली दिली आहेत. त्यापैकी अयोग्य वाक्ये ओळखा.
१] जगातील सर्वाधिक मतदार भारतात आहेत.
२] भारतात निर्वाचन आयोग खूप शक्तिशाली आहे.
३] भारतात १८ वर्षांपेक्षा अधिक वयाची प्रत्येक व्यक्ती मतदाता आहे.
४] भारतात निवडणुकीत पराभूत झालेली पार्टी जनादेश स्वीकार करते.


१] जगातील सर्वाधिक मतदार भारतात आहेत.
----------------
[प्र.४] भारतीय दंड संहितेमधील कोणते कलम बलात्कार या गुन्ह्याविरुद्ध वापरले जाते?
१] कलम १८०
२] कलम ३७६
३] कलम ४७६
४] कलम ५७६


२] कलम ३७६
----------------
[प्र.५] कमाल जमीन धारणा कायद्याचे उद्दिष्ट कोणते?
अ] मोजक्या हातात जमीन संकलित होण्यास प्रतिबंध करणे.
ब] अतिरिक्त जमिनीवर भूमिहीन शेतमजुरांचे पुनर्वसन करणे.
क] सामाजिक न्याय प्रस्थापित करणे. 

१] अ आणि ब 
२] अ आणि क
३] ब आणि क
४] वरील सर्व


४] वरील सर्व
----------------
[प्र.६] न्यायपालिकेच्या बाबतीत कोणते विधान चुकीचे आहे?
१] संसदेद्वारे पारित प्रत्येक कायद्यास सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी लागते. 
२] जर एखादा कायदा राज्यघटनेच्या विरुध्द असेल तर न्यायपालिका तो रद्द करू शकते. 
३] न्यायपालिका कार्यकारी मंडळापेक्षा स्वतंत्र असते.
४] जर एखाद्या नागरिकाच्या अधिकारांची पायमल्ली होत असेल, तर तो न्यायालयात जाऊ शकतो.


१] संसदेद्वारे पारित प्रत्येक कायद्यास सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी लागते.
----------------
[प्र.७] राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार काही खटले सर्वोच्च न्यायालयाकडे हस्तांतरित केले जातात?  
१] कलम १३९ अ
२] कलम १३९ ब
३] कलम १३९ क
४] कलम १३८


१] कलम १३९ अ
----------------
[प्र.८] खालीलपैकी कोणत्या खटल्यांचा भारतीय संविधानात दिलेल्या ‘मुलभूत हक्क’ प्रकरणाशी संबंध नाही?
१] केशवानंद वि. केरळ राज्य 
२] गोलकनाथ वि. पंजाब राज्य 
३] मोहिरीबिबी वि. धरमदास घोष
४] शंकरीप्रसाद खटला


३] मोहिरीबिबी वि. धरमदास घोष
----------------
[प्र.९] आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये लोकशाही व्यवस्थेची गरज आहे, कारण .....
१] विकसित राष्ट्रांच्या शब्दाला जास्त किंमत प्राप्त होईल.
२] विभिन्न राष्ट्रांच्या समस्यांचे निराकरण त्यांच्या सैन्य बळाकडे बघून केले जावे. 
३] राष्ट्रांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात सुविधा मिळाव्यात.
४] जगातील सर्व राष्ट्रांशी समान व्यवहार व्हावे.


४] जगातील सर्व राष्ट्रांशी समान व्यवहार व्हावे.
----------------
[प्र.१०] UPSC द्वारे घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांसंबंधी सुधारणांसाठी डॉ. अरुण निगवेकर समितीने कोणत्या शिफारसी केल्या आहे?
अ] उमेदवारांकडे गतिमान प्रशासनासाठीचे कौशल्य असावे. 
ब] समाज व सरकार यामधील दुवा बनवण्याची क्षमता उमेदवारांमध्ये असावी.
क] परीक्षांचा (प्रक्रिया) कालावधी ६ महिन्यांपर्यंत कमी करावा.
ड] विषय ज्ञानाबरोबरच व्यवहार ज्ञान असावे.

१] फक्त अ, क आणि ड
२] फक्त ब. क आणि ड
३] फक्त अ, ब आणि ड
४] वरील सर्व


३] फक्त अ, ब आणि ड
(परीक्षांचा (प्रक्रिया) कालावधी १० महिन्यांपर्यंत कमी करावा.)
----------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा